SBI Account Holders: भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सर्व खातेदारांना 2 हजार रुपये देणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु या अगोदर आपण हे पाहणार आहोत की जेव्हापासून भारत देश स्वतंत्र झाला. त्यापासून आजपर्यंत अनेक सामान्य नागरिक बँकेच्या विभिन्न प्रकारच्या सेवांपासून वंचित होते.
इतकंच नाही तर सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये राहणारे आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक विशेषता वंचित राहत होते. यांना बँक अकाउंट, विमा सेवा आणि कर्ज सुविधा यांच्या बद्दल काहीच माहिती नसायचे. म्हणून या लोकांचा विकासामध्ये खूप कमी सहभाग असायचा. हे असे हाल पाहून भारत सरकारने 2014 साली जनधन योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत या लोकांना बँकिंगच्या बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या.
काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना?
आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे आणि ही योजना का सुरू केली आहे. तर बघा ही योजना सुरू करण्याचा उद्देश हाच होता की ग्रामीण भागातल्या लोकांना बँकिंगचा पुरेपूर लाभ मिळावा. याव्यतिरिक्त जेवढ्या पारंपारिक बँक होत्या. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या तर काही नागरिकांकडे कागदपत्रे नसायचे. तर काही लोकांची अशी अवस्था होती.
की त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते बँक खाते ओपन करू शकत नव्हते. गावामध्ये बँक शाखा नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना सेवा मिळणं खूप अवघड होत होते. यामुळे गरीब नागरिक बँकिंग सुविधांपासून वंचित राहायचे. ज्या लोकांना आर्थिक अडचण यायची. त्यांना सावकार वर जास्त अवलंबून राहण्याची गरज येत होती आणि सावकार यांचा पुरेपूर फायदा घेत होते. म्हणून जनधन योजनेची सुरुवात केली आहे.
खाते उघडण्याची सुविधा
सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या नागरिकांकडे स्वतःचे बँक खाते नाही. ते आता सुद्धा जनधन चे खाते काढून बरेच लाभ प्राप्त करू शकतात. प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडणे खूप सोपे आहे आणि कोणत्याही बँकेत खोलण्याची सुविधा मिळते. जनधन खाते उघडण्यासाठी तुमच्याजवळ सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड आहे. विशेषता म्हणजे बँक खाते ओपन करता वेळेस तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाही.
इतकेच नव्हे तर तुम्हाला खात्यासोबतच फ्री मध्ये डेबिट कार्ड दिले जाते. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल व्यवहार सहजपणे करू शकतात. या योजनेची वैशिष्ट्ये हीच आहे की खातेदाराला 1 लाख रुपयाचा विमा तर 2 लाख रुपयाचा अपघात विमा मिळतो. याव्यतिरिक्त बँक खातेदारांना 10 हजार रुपयाची ओव्हरड्राफ्ट ची सुविधा सुद्धा मिळू शकते. म्हणजेच अशा प्रकारचे खूप लाभ नागरिकांना मिळतात.
महिलांसाठी आर्थिक जनधन योजना
पहिल्या काळात असे व्हायचे की बँकेचे खाते फक्त पुरुषांच्या नावावर उघडल्या जात होते. परंतु आता जनधन योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सोयीसाठी महिलांच्या नावावर स्वतंत्रपणे बँक खाते उघडून दिली जात आहे. यामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती चांगलीच वाढली आहे.
या योजनेमुळे बऱ्याच महिलांना लघुउद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळू लागली. या व्यतिरिक्त आजच्या काळात डिजिटल अर्थव्यवस्थाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणे होत आहे. उदाहरणार्थ सध्याच्या परिस्थितीत मोबाईल बँकिंग आणि यूपीआय सारख्या सुविधांचा खूप मोठे प्रमाणात वापर वाढला आहे. यामुळे ट्रांजेक्शन ना खूप चालणार मिळाली.