Rain Alert: अखेर महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाळा सुरू झाला आहे आणि परत एकदा पावसाने जोर पकडला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर सगळ्यात जास्त रायगड, रत्नागिरी, कोकण, पुणे आणि सिंधुदुर्ग भागात पाहायला मिळत आहे. या भागांमध्ये इतका पाऊस पडत आहे की काही ठिकाणे पाण्याने भरून गेले आहे.
तथापि, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडली की एका नदीत एक तरुण वाहून गेला. तर तुम्ही याचा अंदाज घेऊन समजू शकता की राज्यामध्ये किती जोरदार पाणी सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांना आणि सरकारला सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतो?
हवामान खात्याच्या माहितीनुसार सांगायचे झाले तर येणारे पुढील पाच दिवस विदर्भ आणि कोकणासाठी संकटमय ठरणार आहे. कारण या भागामध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचबरोबर रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणून या शहरातील लोकांना सांगण्यात येते की जर तुम्हाला महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर जावे. अन्यथा तुम्ही घरीच राहा.
याचबरोबर तुम्हाला स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर रायगड मधील मुरुड, पेन, अलिबाग, रोहा आणि माणगाव या जागी रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खूप जागी आणि जास्त प्रमाणात पाणी साचले आहे. याशिवाय पुण्यामध्ये सकाळपासून पावसाचा जोर सतत वाढत चालला आहे.
या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पुढील 5 दिवस संकटमय
जे शेतकरी पुढील येणाऱ्या पाच दिवसांमध्ये पेरणीची तयारी करणार आहे. त्यांच्यासाठी हेच पाच दिवस संकटमय असणार आहे. कारण काही भागात पावसाची स्थिती खूप गंभीर बनणार आहे आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खूप जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते. असा अंदाज हवामान विभागाकडून दर्शविण्यात आलेला आहे.
याशिवाय जर मुंबई शहराची दोन दिवसांची अवस्था पाहिली तर येथे पाऊस खूप कमी प्रमाणात पडला होता. परंतु हवामान खात्यानुसार येणाऱ्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई शहर यांच्या शेतकऱ्यांना स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. याचबरोबर नंदुरबार शहरांमध्ये दोन दिवस पाऊस थांबला होता. परंतु येथे पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना
हवामान विभागाकडून राज्यातील संपूर्ण नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम नागरिकांनी विनाकारण कुठेही प्रवास करू नये. जर तुम्हाला अर्जंट काम असेल तरच तुम्ही प्रवास करा. नाहीतर शक्यतो घरीच राहून तुम्ही सुरक्षित राहावं. याव्यतिरिक्त जर रस्ते, पूल, ओढे आणि नद्या येथे भरपूर प्रमाणात पाणी वाहत असेल. तर त्यांच्याजवळ जाऊ नका.
जर तुम्ही दरीमध्ये फिरायला जात असाल तर सावध व्हा. कारण येथे दरड कोसळण्याचे धोके निर्माण होतात. म्हणून सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. आणि हो शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की शेतात पाणी साचू द्यायचे नाही. हवामान खात्याकडून जेवढी माहिती दिली आहे. तेवढी माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगितली आहे.
आता फक्त 500 रुपयांत करा आपल्या शेत जमिनीची मोजणी, पहा कसा मिळणार फायदा