Nuksan Bharpai Manjur Batmi: मागील काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप नुकसान झालं आहे आणि यामुळे लाखोंच्या संख्येने शेतकरी त्रस्त झाले आहे. पण अशावेळी बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने 12 जून रोजी एक अत्यंत महत्त्वाचा जीआर जारी केलेला आहे.
या जीआर मध्ये 2024 वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई राज्य सरकार द्वारा मंजूर केली आहे. याचबरोबर सांगायचे तर 32 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम 64 कोटी 75 लाख 83 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर चला बघूया महाराष्ट्रातील कोणत्या 32 जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात येणार आहे.
प्रलंबित विषयांचे उपाय
खूप महिने झाले ज्या नागरिकांचे व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्यांना मदतीची खूप प्रतीक्षा करावी लागलेली आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो जून 2023 ते डिसेंबर 2024 या दरम्यान झालेल्या संपूर्ण नुकसानाची जी भरपाई होती ती आतापर्यंत बाकी होती. पण आता महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व विषयांचे निराकरण होणार आहे.
या सर्व नुकसानाची भरपाई दिली जाणार आहे
या नुकसान भरपाई मध्ये शेतीच्या नुकसान भरपाई बरोबर इतर प्रकारच्या नुकसानीचा सुद्धा समावेश केलेला आहे. जसे की घरांची पडझड झाल्यास मदत दिली जाईल. भांडी आणि वस्तू वाहून गेल्यास भरपाई मिळेल. जर घरातील साहित्याची नुकसान झाले असेल तर त्यावर सुद्धा मदत दिली जाईल आणि इतकंच नाही तर कपडे आणि वैयक्तिक वस्तूंचे नुकसानाची भरपाई सुद्धा दिली जाणार आहे.
व्यावसायिक नुकसान बद्दल बोलायचे तर अतिवृष्टी मधील ज्या व्यक्तीचे दुकानांचे नुकसान झालेले आहे. त्यांना सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याचबरोबर टपऱ्यांची आणि छोटे व्यावसायिक संस्थाची नुकसान भरून दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त मत्स्य व्यवसायांना नुकसान झाल्याची भरपाई राज्य सरकार द्वारा मिळणार आहे.
विभागाच्या वितरणाचे व्यवस्थापन
अधिकृत माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 5 ते 6 विभागामधील जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम नागपूर विभागाच्या बद्दल बोलायचे तर या जिल्ह्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यातील नागरिकांना भरपाई मिळणार आहे. या व्यतिरिक्त कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
याचबरोबर मराठवाडा विभागाची गोष्ट केली तर यामध्ये परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यातील सर्व बाधितांना भरपाई मिळणार आहे. विदर्भ आणि इतर विभागामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला. याचबरोबर पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली आणि नाशिक विभागातील धुळे नंदुरबार अहिल्यानगर नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांतील नागरिकांना भरपाई मिळणार आहे.
मदत वितरणाची प्रक्रिया कशी असणार आहे?
2023 आणि 2024 या वर्षाच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक लोकांना त्रास झालेला आहे आणि यामुळेच आर्थिक मदतीची खूप गरज आहे. हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घेऊन मदत वितरणासाठी एक नवीन जीआर जाहीर केला आहे. त्यामध्ये 32 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या 32 जिल्ह्यांमध्ये जितक्या नागरिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांना भरपाई देण्यात येणार आहे
मदतीचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केले जाईल. ज्या नागरिकांचे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांनी महत्त्वाचे कागदपत्र तयार ठेवावेत आणि याच बरोबर स्थानिक प्रशासनाशी संपर्क सुद्धा साधावा. लक्ष द्या जर तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे असेल तर अर्ज करताना तुमच्याजवळ महत्त्वाची कागदपत्र ठेवणं अनिवार्य आहे.