WhatsApp

Namo Shetkari Yojana: यावेळेस मिळणार फक्त इतक्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आनंदाची बातमी हीच आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. 

सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या आशावर बसलेले आहे. परंतु अजून पर्यंत सरकारकडून या संबंधित अधिकृत माहिती आली नाही. परंतु काही सूत्रांच्या अनुसार जर आपण गृहीत धरलं तर लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यांना आर्थिक आधार सुद्धा मिळणार आहे.

योजनाच्या माध्यमातून आर्थिक मदत

जसे आपल्या सर्वांना माहित आहे की जून महिन्यामध्ये महाराष्ट्र मध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामधील खरीप हंगाम सुरू होतो आणि या दिवसात पेरणीला सुरुवात लागते. याचबरोबर पावसाळी पिकांच्या लागवडीसाठी हा जो काळ आहे खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी खूप प्रकारच्या वस्तू विकत घ्यायच्या असतात. 

उदाहरणार्थ उच्च दर्जाचे बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खत आणि इतर वस्तू विकत घ्याव्या लागतात आणि यासाठीच शेतकऱ्यांना पैसे पाहिजे असतात. जर एका हिशोबाने पाहिलं तर पीएम किसन योजनेचा जो हप्ता येतो तो एप्रिल ते जुलै महिन्याच्या कालावधीतच वितरित केला जातो. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

इतक्या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत 

नमो शेतकरी योजनेचा फायदा केवळ महाराष्ट्रातील शेतकरीच घेऊ शकतात. अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मध्ये या योजनेचा लाभ कमीत कमी 93 लाख 50 हजारांपेक्षा जास्त शेतकरी घेत आहे. 

तसं जर पाहिलं तर मागील वर्षी ही संख्या थोडीशी कमी होती. याचबरोबर जर पीएम किसान योजनेचा लाभ किती शेतकरी घेत आहे हे पाहिलं तर वर्तमानामध्ये 13 करोड पेक्षा जास्त शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे.

मोठ्या प्रमाणात घेतला शेतकऱ्यांनी सहभाग 

यावर्षीच्या नोंदणी प्रोसेस मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्साहजनक आपले नाव नोंदविलेले आहे. याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा ॲग्रीस्टेक अधिकृत वेबसाईटवर एक विशेष नोंदणीची मोहीम सुद्धा राबविण्यात आली होती. या कालावधीत 31 मे 2025 पर्यंत नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी सरकार द्वारा देण्यात आली होती. 

इतकेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांना कागदपत्रांमधील त्रुटी म्हणजेच अडचण आलेली आहे. त्यांना सरकारमार्फत 31 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

आर्थिक योजना आखणे आवश्यक 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेळेवर निधीचा वाटप वितरित केला जावा. यासाठी काही गोष्टीवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आता यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी बँक खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधेसाठी ऍक्टिव्ह असणे खूप आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे  बँकेत नोंदवलेली असली पाहिजे. 

याशिवाय एफटीओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक रक्कम जमा केली जात नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी एफटीओ ची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना लवकर दोन हजार रुपयांचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला वरील गोष्टींचे पालन करावे लागणार आहे.

सरकार महिलांना देणार 40 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment