Farmers Loan News: सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी उपोषण आणि आंदोलन काही दिवसांपूर्वी सुरू केलेले आहे. पण आता हे उपोषण समाप्त होत दिसत आहे. कारण महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अमरावती मध्ये जाऊन बच्चू कडू यांच्याशी बैठक केली आहे.
या स्थितीवरून अशी शक्यता दर्शवते की बच्चू कडूंच्या संघर्षाला लवकरच विराम लागणार आहे. म्हणजेच कडूने शेतकऱ्यांसाठी जेवढ्या मागण्या मागितलेल्या आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील अशी स्थिती निर्माण झालेली वाटत आहे. इतकंच नाही तर या मागणीमध्ये यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ सुद्धा होणार आहे.
बच्चू कडूचा शेतकऱ्यांसाठी लढा
मिळालेल्या बातमीनुसार गेल्या पाच ते सहा दिवसापासून बच्चू कडू यांनी अनेक प्रकारच्या मागण्या केल्या आहे आणि त्याचबरोबर मागणी पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू ठेवली आहे. पण आता हे उपोषणाचे आंदोलन लवकरात लवकर समाप्त होणार आहे. कडूने महाराष्ट्र सरकारकडे बऱ्याच मागण्या केलेल्या आहे.
त्यामध्ये सर्वप्रथम अपंग व्यक्तींना दर महिन्याला सहा हजार रुपयांचे अनुदान भेटले पाहिजे. याचबरोबर शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजे. इतकच नाही तर जे शेतकरी नियमितपणे दरवर्षी कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान दिले पाहिजे. याव्यतिरिक्त शेतमालावर योग्य भाव मिळाला पाहिजे. या सर्व मान्य बच्चू कडू ने शासनाकडे केलेल्या आहे.
सरकारी स्तरावर मिळाला चांगलाच जाब
बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण करणार आहेत हे अगोदरच मुख्यमंत्री कार्यालयाला माहित होतं. म्हणजे याची माहिती देण्यात सुद्धा आली होती. गेल्या 6 दिवसापूर्वी पासून तर आज जाऊन प्रत्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली.
भेट घेतल्यानंतर सर्वप्रथम बावनकुळे यांनी कडूची तब्येतीची चौकशी केली आणि त्यानंतर या मागण्यावर सविस्तरपणे चर्चा केली. चर्चा सुरू असताना बावनकुळे यांनी उपोषण आंदोलन थांबवण्याची नम्र विनंती सुद्धा केली. यानंतर बच्चू कडूंने सांगितले की जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नसाल तर मी पुन्हा या आंदोलनाचा पर्याय निवडेल.
कर्जमुक्तीसाठी खास समितीची स्थापना करावी
बच्चू कडूने जे आमरण उपोषण घेण्याचे ठरविले होते. ते विशेषतः शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी घेतले होते. कडूचं म्हणणं हेच होतं की गरीब आणि सामान्य शेतकऱ्यांना खरा कर्जमुक्तीचा लाभ मिळावा. इतकंच नाही तर त्यांनी दृष्टांत आणून दिले की 2015 आणि 2019 च्या कर्जमुक्ती योजनेमध्ये फक्त मोठे आणि राजकीय लोकांनाच फायदा मिळाला होता.
यानंतर बावनकुळे यांनी खात्री दिली की शेतकरी कर्जमुक्ताचा फायदा योग्य शेतकऱ्यांना मिळावा. यासाठी खास समितीची स्थापना तयार केली जाईल आणि या समितीचे सदस्य म्हणून आमदार बच्चू कडू यांना निवडण्यात येईल. अधिकृत माहितीनुसार या समितीमध्ये अनेक प्रकारच्या कर्जांचा समावेश असणार आहे. जसे की खाजगी सावकारी कर्ज आणि तारण कर्ज आणि हो या कर्जाचा अभ्यास करूनच कर्जमुक्ती लागू केली जाणार आहे..
अपंग व्यक्तीच्या अनुदानात होणार वाढ
सध्याच्या काळात पाहिलं तर अपंग व्यक्तींना फक्त 1500 रुपये दर महिन्याला अनुदान मिळते आणि हे अनुदान अत्यंत खूप कमी आहे. जर तसं पाहिले तर शेजारच्या राज्यात अपंग व्यक्तीला कमीत कमी 6 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळते आणि इतकंच अनुदान महाराष्ट्रामधील अपंग व्यक्तींना मिळावं. अशी मागणी शासनाकडे केली आहे. नंतर यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी फलदायी प्रतिसाद दर्शविला आहे. येणाऱ्या 30 जून पासून पावसाळी विधानसभेमध्ये अपंग व्यक्तीच्या मासिक अनुदानात वाढ व्हावी.
यासाठी प्रस्ताव मांडल्या जाणार आहे असे आश्वासन बच्चू कडूनां बावनकुळे द्वारा देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी ही सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. सध्या जर पाहिलं तर फक्त धान्याला बोनस देण्यात येतो. पण सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, मूग, उडीद, ज्वारी आणि हरभराच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त होतो.
या दिवशी येणार पीएम किसान 20व्या हप्त्यांचे पैसे, तारीख झाली जाहीर