Farmer ID Card: काही महिन्यापूर्वी सरकारने विशेषतः शेतकऱ्यासाठी फार्मर आयडीची घोषणा केलेली आहे. आता या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विभिन्न प्रकारचे लाभ मिळणार आहे. पण तुम्हाला जर सर्व योजनेचे लाभ घ्यायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे खूप आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल.
तर शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही. यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आयडी बनवून घ्यावी आणि सरकारच्या योजनेच्या माध्यमातून बरेच फायदा मिळवावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे शेतकरी कार्ड नसेल तर तुम्हाला भविष्यात विम्याचा लाभ मिळणार नाही. तर चला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
काय आहे फार्मर आयडीचे महत्व?
आजच्या काळामध्ये पाहिले तर सरकारने फार्मर आयडी यासाठी काढलेली आहे. कारण शेतकरी कार्डच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनाचा लाभ खूप सोप्या पद्धतीने घेता येई. या उद्देशाने या योजनेची सुरुवात केलेली आहे.
या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना कृषी विमा योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि फळपीक संरक्षण योजने सारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी शेतकरी कार्ड हे सरकारने बंधनकारक केले आहे. खरं म्हणलं तर या निर्णयाचा हाच उद्देश आहे की योग्य शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत पोहोचवणे आणि अपात्र शेतकऱ्यांना गैरफायदा घेता न येणे हा आहे.
काय आहे विमा योजनेचे नवीन नियम?
सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मृग नक्षत्रातील फळपीक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याचबरोबर सरकारकडून एक महत्त्वाचा बदल करण्यात सुद्धा आलेला आहे आणि तो बदल म्हणजे हा आहे की आता यापुढे विमा योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल.
तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर ही जी योजना आहे ही फ्युचर जनरली, भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स आणि युनिव्हर्सल सोंपो सारख्या मोठ-मोठ्या कंपन्या अंतर्गत चालवलेली जात आहे. उदाहरणांमध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरला पण त्याच्याकडे फार्मर आयडी नाही तर अशा परिस्थिती त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा लाभ देण्यात येणार नाही.
नेमकी काय आहे फार्मर आयडी?
फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी कार्ड हे एक डिजिटल कार्ड आहे. ज्यामध्ये तुम्हाला 16 अंकाचा नंबर दिला जातो आणि हा जो नंबर आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या सातबारा उताराच्या आधारे दिला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर शेतकरी ओळखपत्र ॲग्रीस्टॅक च्या सरकारी डिजिटल प्लेटफॉर्म च्या माध्यमातून बनवले जाते.
ॲग्रीस्टॅक हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांची सर्व पर्सनल माहिती एकत्रित ठेवतो. जसं की तुमच्या जमिनीचे तपशील, शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती, सिंचन सुविधा, पिकाची माहिती आणि कृषी यंत्रसामग्री सारखी माहिती एकत्रित ठेवतो.
फार्मर आयडी साठी नोंदणी कशी करावी?
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढली नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावी. फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जायचं आहे आणि तिथून शेतकरी कार्ड काढायचे आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा आणि सक्रिय मोबाईल नंबर घेऊन जायचे आहे.
मोबाईल नंबर यासाठी घेऊन जायचा आहे कारण त्यावर ओटीपी येतो आणि ओटीपी हा खूप महत्त्वाचा असतो. नोंदणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला फार्मर आयडी प्राप्त होते. वाटल्यास तुम्ही शेतकरी कार्डची प्रिंट आउट सुद्धा काढू शकता.