WhatsApp

Bandhkam Kamgar Mofat Bhandi: आता बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी, येथे करा अर्ज

Bandhkam Kamgar Mofat Bhandi: महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये जेवढे कामगार आहे त्यांना सरकारकडून मोफत घरगुती साहित्य संच म्हणजेच भांड्याचा संच दिला जाणार आहे. इतकेच नव्हे तर याबरोबर सुरक्षा उपकरणे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. या गोष्टीमुळे आता कामगारांना खूप चांगली सुविधा सरकारमार्फत मिळणार आहे.

महाराष्ट्रातील जितके श्रमिक आहे त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणते आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पात्रता काय पाहिजे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा आहे? ही सर्व माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगितली गेलेली आहे.

सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने 2 महत्त्वाचे निर्णय घेतले आणि जाहीर केले आहे. सरकार द्वारा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत राबवण्यासाठी व या योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी घेतला आहे. खरं म्हटलं तर या सुधारणांचा मुख्य उद्देश हाच आहे की बांधकाम कामगारापर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा.

योजनेमधील केला बदल

जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगण्यात येते की या अगोदर जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कामगारांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायची गरज नव्हती. बिना अर्ज केल्याचा लाभ श्रमिकांना मिळत होता.

परंतु योजनेमधील काही मुख्य बदल केल्यामुळे आता कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला मोफत मध्ये भांड्याचा संच मिळणार आहे.

कोणत्या वस्तू आणि भांडी भेटणार आहे?

जर तुमच्या मनात शंका असेल की या योजनेच्या माध्यमातून आम्हाला कोणकोणत्या वस्तू आणि भांडी भेटणार आहे. तर बघा नवीन नियमांनुसार यावेळेस घरगुती भाड्याच्या संचात खूप उपयोगी वस्तूंचा समावेश होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जस्ताच्या पेट्या, धान्य साठवण्यासाठी 25 किलो आणि 22 किलोचे कंटेनर, प्लास्टिकची चटई, बेडशीट, उन्हाळी कंबल, चादर, साखर, चहा पावडर ठेवण्यासाठी स्टील कंटेनर आणि 18 लिटरचे वाटर प्युरिफायर भेटणार आहे.

याव्यतिरिक्त कामगारांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देत सरकारकडून खूप महत्त्वाची उपकरणे दिले जाणार आहे. त्यामध्ये सुरक्षा बूट कानाचे प्लग हार्नेस, मास्क, हेल्मेट, हातमोजे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, सुरक्षा चष्मा, पाण्याची बाटली, मच्छरदाणी, सोलर टॉर्च, स्टीलचा टिफिन बॉक्स आणि प्रवासी बॅग देण्यात येणार आहे.

अर्जाबद्दल थोडीशी माहिती

अधिकृत मिळाल्या माहितीनुसार सांगायचे तर नवीन नियमांनुसार सरकारकडे आणि महामंडळाकडे नोंदणी असलेले कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मोफतपणे भांड्याचा संच आणि सुरक्षितेचा संच घेण्यासाठी तुम्हाला नमुन्यात अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या अर्जाच्या आधारितचं तुम्हाला आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कामगारांना महत्त्वाची सूचना

जर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मोफत भांडी पाहिजे असेल. तर तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला या योजनेविषयी अजून माहिती पाहिजे असेल. तर तुम्हाला महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

नाहीतर तुम्ही तुमच्या जवळपासच्या कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करू शकता. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता कामगारांना खूप चांगली सुविधा मिळणार आहे.

Leave a Comment