Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये जितके श्रमिक बांधकाम क्षेत्रामध्ये लोकं काम करत आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि फायद्याची बातमी आहे. सरकारने या बांधकाम कामगारांसाठी खूप सार्या योजना राबविल्या आहे आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच गृहनिर्माण योजना आहे.
या योजनेच्या अंतर्गत कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्याकरिता आर्थिक मदत प्रदान केली जाते. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचायचा आहे.
या योजनेचे वैशिष्ट्ये
जर या योजनेची वैशिष्ट्ये आपण पाहिले तर सर्वप्रथम या योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना नवीन घर बांधण्यासाठी जवळपास 2 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. इतकेच नव्हे तर जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची वेगळी मदत सुद्धा दिली जाते.
खरं म्हटलं तर ही संधी त्या लोकांनी घ्यावी जे खूप वर्षापासून दुसऱ्यांच्या घरी काम करत आलेले आहे. कारण बांधकाम व्यवसायामध्ये लोक दिवस राहत एकत्र करून दुसऱ्यांसाठी घर बांधतात. पण मात्र स्वतःच्या राहण्याची योग्य ती सोय नसते. म्हणून ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ प्राप्त करून घ्यावा.
लाभ घेण्याकरिता पात्रता
ज्या कोणत्याही व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना काही अटी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामधील सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात अगोदरच झालेली असावी. याव्यतिरिक्त अर्जदाराने गेल्या एका वर्षात किमान 90 दिवस बांधकाम कामात काम केले असले पाहिजे.
आणि हो अर्जदार करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्ष तर जास्तीत जास्त 60 वर्ष असणे खूप आवश्यक आहे. तुम्ही या अगोदर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल, तर तुम्हाला या योजनेचा नक्की फायदा मिळणार.
कामगारांना मिळणार या सुविधा
महाराष्ट्र शासनाद्वारे गृहनिर्माण योजनेत अतिरिक्त बऱ्याच योजना राबविल्या जात आहे. सर्वप्रथम कामगारांना आता काम करत असताना जर काही झाले तर त्यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या व्यतिरिक्त नियमित तपासणी सुद्धा केली जाणार आहे. चांगली गोष्ट हीच आहे की गंभीर आजारांवरील सुद्धा उपचार केले जाईल.
इतकेच नव्हे तर जर कामगारांना काम करता वेळेस काही इजा झाली. तर त्यासाठी अपघात झालेल्या कामगारांना विमा कव्हरेज सुद्धा दिले जाणार आहे आणि याच बरोबर कामगारांच्या कुटुंबांना जीवन विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान केले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांकडे बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याचबरोबर आधार कार्ड, निवासी पत्त्याचा पुरावा, कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, बँक खात्यांची माहिती आणि जमीन किंवा घराशी संबंधित असलेले कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
कशासाठी आणि कसे मिळणार 1 लाख रुपये
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये जमीन घेण्यासाठी मिळणार आहे आणि इतक्या पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कुठेही जाण्याची गरज नाही. कारण आता या डिजिटल युगामध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
याव्यतिरिक्त जिल्हा आणि तालुका स्तरावर सरकारद्वारे माहिती केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. येथे अर्जदारांना योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिल्या जाते आणि अर्ज कसा करायचा यामध्ये सुद्धा मदत केली जाते.
एअरटेलचा नवा धमाकेदार प्लॅन, फक्त इतक्या किंमतीत करा स्वस्त रिचार्ज
1 thought on “Bandhkam Kamgar Yojana: सरकारकडून बांधकाम मजुरांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे मिळतील”