Bima Sakhi Yojana: महिलांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना सध्या राबविल्या जात आहे आणि अशाच वेळेमध्ये सरकारने अशी योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काय करावे लागेल.
याव्यतिरिक्त कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतील. ही सर्व माहिती तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगितली गेली आहे. आम्ही ज्या योजनेबद्दल माहिती सांगत आहे. त्या योजनेचे नाव विमा सखी योजना आहे. या स्कीमच्या माध्यमातून गरजू आणि पात्र लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. तर चला बघूया याबद्दल संपूर्ण माहिती विस्तारपणे.
काय आहे नेमकी विमा सखी योजना ?
महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांच्या प्रगतीसाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना वर्तमानामध्ये राबविल्या जात आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश हाच असतो की महिलांनी स्वावलंबी व्हावे.
याव्यतिरिक्त सध्याच्या स्थितीत एक योजना खूप चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. परंतु एवढा मोठा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करायच्या आहे. त्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट वर पैसे जमा केली जाईल.
योजनेचा लाभ
केंद्र सरकार आणि राज्य सरकार खास करून महिलांच्या सशक्तिकरणासाठी अनेक प्रकारच्या योजना चालवत आहे. तथापि या कल्याणकारी योजनाच्या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाते. सध्या महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
तर काही योजना च्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज सुद्धा वितरित केले जात आहे. खरं म्हटलं तर या योजनेचा एकच उद्देश आहे की महिलांना स्वावलंबी बनवणे. हे सर्व पाहून सरकारी विमा कंपनी एलआयसी ने महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव विमा सखी योजना ठेवले आहे. या स्कीमचा विशेषता लाभ केवळ महिलाच घेऊ शकतात.
असे मिळतील महिन्याला 7 हजार रुपये
महिलांना सांगण्यात येते की भारत सरकार आणि एलआयसी यांच्या प्रयत्नातून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 5 ते 7 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एलआयसी एजंट व्हावे लागणार आहे. इतकंच नव्हे तर एलआयसी एजंट होण्याकरिता ट्रेनिंग सुद्धा दिली जाते.
ट्रेनिंग दरम्यान महिलांना पाच हजार ते सात हजार रुपये पर्यंत दिले जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण होईल त्यानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर सरकारचं लक्ष हेच आहे की या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी एक लाख महिला विमा सखी बनल्या पाहिजे.
या योजनेसाठी पात्रता
एलआयसी विमा सखी योजनेसाठी फक्त महिलांच अर्ज करू शकतात. या योजनेसाठी पुरुषांना कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाही. ज्या महिलांना अर्ज करायचे आहे त्यांचं कमीत कमी व 18 वर्ष तर जास्तीत जास्त वय 70 वर्ष असणे आवश्यक आहे. याचबरोबर शैक्षणिक पात्रता किमान दहावा वर्ग पास असणे गरजेचे आहे.
लक्ष द्या प्रत्येक महिलांची शैक्षणिक योग्यता दहावी पास असणे महत्त्वाचे आहे. महिलांजवळ आवश्यक कागदपत्रे पाहिजे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे अशाच महिलांनी यासाठी अर्ज करावा.
सिर्फ जिओ यूजर्स के लिए, 56 दिन तक कॉल और 5G डाटा बिल्कुल फ्री, जानें पूरा रिचार्ज प्लान