Post Office KVP Scheme: पोस्ट ऑफिस मध्ये विभिन्न प्रकारच्या योजना चालविल्या जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का? पोस्ट ऑफिस मध्ये एक अशी योजना राबवली जात आहे. ज्यामध्ये जर तुम्ही 2 लाख रुपये जमा करत असाल, तर तुम्हाला 4 लाख रुपये मिळतात. आम्ही ज्या योजनेबद्दल सांगत आहे. त्या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना आहे.
या योजनांमध्ये शेतकरी नाही तर देशांमध्ये संपूर्ण नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेची चांगली गोष्ट हीच आहे की तुम्ही जमा केलेल्या पैशावर बँक एफडी एवढेच व्याज तुम्हाला दिले जाते. याचबरोबर तुम्ही जेवढ्या रकमेची गुंतवणूक करसाल. तेवढेच पैसे तुम्हाला डबल मिळतात. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे म्हणून तुमचे पैसे सुद्धा सुरक्षित राहतात.
या योजनेमध्ये कोण करू शकते गुंतवणूक?
सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या योजनेमध्ये कोण-कोण गुंतवणूक करू शकते. तर बघा किसान विकास पत्र योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे इन्वेस्टमेंट करायचे असेल, तर तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असणं खूप गरजेचं आहे. या योजनेमध्ये सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट काढण्याची सुविधा मिळते.
याच बरोबर जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या नावावर सुद्धा खातं ओपन करता येते. लक्ष द्या लहान मुलांचं खातं फक्त मार्गदर्शक किंवा आई-बाबा च्या माध्यमातूनच काढल्या जाऊ शकते. याव्यतिरिक्त हिंदू अविभक्त कुटुंब आणि ट्रस्ट यांना सुद्धा गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे.
इतके मिळेल व्याज
अधिकृत माहितीनुसार केंद्र सरकारने 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिस केवीपी स्कीम वरील व्याज दरात थोडी वाढ केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून जास्त फायदा मिळतो. व्याजा बद्दल सांगायचं तर जमा केलेल्या पैशावर तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.
तुम्ही या योजनेमध्ये जितके पैसे गुंतवणूक करसाल त्या दुप्पट तुम्हाला पैसे मिळतात. जर मॅच्युरिटी पिरियडची गोष्ट केली तर तुम्हाला कमीत कमी 115 महिन्यापर्यंत पैसे गुंतवणूक करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला डबल पैसे मिळतात. याचबरोबर तुम्हाला कंपाउंड इंटरेस्टचा सुद्धा फायदा मिळतो.
परिपक्वताच्या अगोदर खाते बंद केले तर काय होईल?
जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेमध्ये पैसे गुंतवणूक केली, तर तुम्हाला खूप सारे फायदे मिळतात. उदाहरणांमध्ये जर कोणत्या व्यक्तीने या स्कीम मध्ये पैसे गुंतवले आणि त्यांना अचानक पैशाची गरज भासते तर अशावेळी ते मॅच्युरिटी पूर्वी अकाउंट कधीही बंद करू शकतात.
आणि पैसे वापस घेऊ शकतात. याशिवाय जर खातेदारांचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत खातं बंद केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त000p कोर्टाच्या आदेशावरून दोन वर्षे सहा महिन्यानंतर किंवा पैसे गुंतवणूक करण्याच्या तारखेनंतर खात बंद केलं जाऊ शकतं.
किती महिन्यात मिळेल दुप्पट रक्कम
जर तुम्हाला खरोखर तुमचे पैसे डबल करायचे असेल तर तुम्हाला जवळपास 115 महिने पैसे जमा करावे लागेल म्हणजेच नव वर्ष आणि सात महिने. जर तुम्ही आज दोन लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 115 महिन्यानंतर चार लाख रुपये मिळतील.
हवामान खात्याचा ताजा इशारा, शेतकऱ्यांसाठी पुढील 5 दिवस संकटमय, वाचा येथे संपूर्ण माहिती